मराठी आणि हिंदी मालिका व आपण

मराठी आणि हिंदी मालिका व आपण
मित्रानो  आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचे वेसन आपल्याला नकळत लागले आहे पण याची जाणीव आल्याला होत नाही. जसा की तो विषय आपला रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे तो विषय म्हणजे आपण रोज TV वर पहाणारी  मराठी / हिंदी  मालिका.
बहुतांश मालिकांमध्ये द्वेष, ईर्षा, नात्यामधील विकोपाला गेलेला वाद, घरगुती भांडण, सासू सुनेचा  किवा नणंद,भावजय यांच्या मधील शाब्दिक युद्ध, भावाभावातील वाद , शिस्त नसणारी  मुले,  नवऱ्याचे किंवा बायकोचे विवाहबाह्य संबंध, आणि इतर खूप काही बघायला मिळत हे कितपत योग्य आहे.
आपण जरा विचार केला पाहिजे की आपण काय बघतोय,  आणि यातून आपल्याला फायदा काय ? काय शिकायला भेटते? हे  आपला खरोखर मनोरंजन आहे का? की नकारात्मक विचारसारणी?.
मराठी / हिंदी  मालिका हया आपल्याला Cable, Dish TV (मग तो कोणता ही असो) चे पैसे भरले तर फ्री बघयला भेटते असा आपला समज आहे. पण हा सर्वात मोठा चुकीचा समाज आहे कारण आपण त्यांना आपला सर्वात बहुमुल्य वेळ देतोय आणि हे आपल्या लक्षात येत नाही. पण मालिका बनवणारे हे सर्व जाणून आहेत म्हणून तर “Prime Time” वर आपली मालिका असाव्यात या साठी धडपड करत असतात.
हया अश्या  मराठी / हिंदी मालिका बघणे म्हणजे एखाद्या घरातील  विकोपाला गेलेला वाद पहाण्यासारखे आहे. आणि यातून मिळत  काहीच नाही पण फायदा निर्मात्याचा, मालिकेत काम करणारी संपूर्ण कलाकारचा होतो  कारण आपण आणि आपले सगळे कुटुंब बहुमुल्य वेळ  त्या मालिकेचा TRP वाढवण्यास देत असतो. जितका जास्त TRP तितक्या जास्त जाहिराती. आज आपण बघतोय मराठी मालिका मराठी संस्कृतीची काय अवस्था आहे ती.
मराठी असो किंवा हिंदी सर्वच मालिका निर्मात्यांनी, लेखकांनी प्रेक्षक वर्गाला नेमक काय हवं आहे याचा  अभ्यास करून कथा बनवलेल्या असतात. त्यांचा मूळ उद्देश असतो तो फक्त TRP वाढवणे आणि आपला फायदा करून घेणे. आणि या साठी ते वाट्टेल ते करतील. आणि या लोकचा आवडीचा विषय म्हणजे कौटुंबिक वाद, कलह.
आपण जे काही बघतो, ऐकतो त्याचा मानवी स्वभाव वर खूप प्रभाव पडतो. मानव जात ही भावनिक आहे. त्यामुळे आपण जे पाहतो ते सकारात्मक आणि नकारात्मक किंवा चांगले आणि वाईट, आवडीचे  किंवा नआवडीचे ह्यचा आपल्या मनावर खूप प्रभाव पडतो. मालिकेतील आपण कोणत्या पात्राशी जुळले जातोय, ते पात्र आपणच आहोत असा समज करून त्या पात्राप्रमाणे आपल्या मनात आपण इतर लोकांबद्दल आपले मत बनवतो त्या पात्रा प्रमाणे आपण राहिला बघतो.
आज आपण बघितला तर ९९% मालिका हया स्त्री प्रधान असतात म्हणजे स्त्री ही जास्तीजास्त मालिकेत (मुख्य भूमिका) नायिका असते. आणि हया नायिकेवर जितका जास्त अन्याय मलिकचा TRP तितकी जास्त हे गणित आहे. डान्स शो, सिंगिंग शो बघा ह्यात तुमच्या चांगल्या कला गुनापेक्षा तुमच्या चांगल्या प्रतिभेपेक्षा  एकद्या गरीब स्पर्धकाची १ नंबर म्हणून निवड केली जाते, स्पर्धेत त्याचे आई वडीलाना बोलवतात त्यांना बोलायला लावतात रडताना दाखवतात, मग स्पर्धक रडताना दाखवतात त्याच्या घरची एकदी VIDEO (REEL) बनवतात मग दाखवतील जाते आणि त्याला जिंकवण्यासाठी  SMS करा असा आव्हान केला जाते. मग आपण भावनिक होऊन भरभरून SMS करतो हयात फायदा त्याचा होतो. हया मध्ये त्याचा  हेतू एकच TRP आणि पैसा……….
मालिका मध्ये जाणूनबुजून रचलेल्या खोट्या कथा असतात. अगदी पद्धतशीरपणे भांडणाच्या स्क्रिप्ट लिहल्या जातात आणि प्रसिद्धी मिळवली जाते. आजकाल पैसे कमवण्याचा हा धंदा झालाय हा आपल्याला समजणार कधी देव जाणे?
पण आपण मात्र अगदी आवडीने वेळ काढून या मालिका बघतो.
आणी हया सर्वात निर्मात्याचा कलाकार मंडळी ह्यांचा काहीच दोष नाही,कारण जे विकले जाते तेच पिकवले पण जाते. अश्या मालिका शो ना जितका जास्त TRP तितका जास्त पैसा मग हे सर्व असेच चालू राहणार वेगळे काश्यला काय कोण करत बसेल आणि रिस्क घेत बसेल, चलाय ते चालू दे आणी आता तेच चालू आहे. ह्यातून समजा मध्ये काय प्रभाव पडतो काय परिणाम होतेय कोण बघतो. मग आपल्याला काय अपेक्षित आहे ह्याचा पण ते लोक विचार करत नाहीत एका सर्वेक्षण रिपोर्ट  नुसार घरगुती नात्यातील वाद दाखवले तर  श्रोतृवर्ग खूप खूष होतो असा आहे.
मराठी / हिंदी  मालिका बनवतांना प्रत्येक पात्र लक्षात घेतले जाते.दोन वेगवेगळी स्वभाव असलेल्या व्यक्ती एक चांगली एक वाईट. कोणी कपटी कोणी धोकेबाज तर कोणी प्रेमळ तर कोणी रागीट, कोणी शांत अशी बरोबर पात्रांची निवड केली जाते आणि गरजे नुसार पात्रे गायब केली जातात नवीन आणली जातात ज्याचा आधी काही कथाणाकशी संबध नसतो निवळ आपण बघतोय म्हणून काय पण दाखवतात कशाचा काश्यला मेळ नसतो अर्थ  नसतो कथानक कसा पण फिरवतात.
मालिकेमधील प्रत्येक पात्र हे आपल्या घरातील लोकाशी मिळता जुळता असते  ते आपल्याला मालिकेमध्ये दिसते आणि आपण जेव्हा मालिका बघतो तेव्हा घरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पात्राशी जोडला  गेलेला असतो.
आपण ज्या मालिका बघतो त्यात पद्धतशीरपणे उन सावल्यांचा खेळ चाललेला असतो, कधी भांडण दाखवणार तर कधी गोडी,कधी आश्चर्य तर काही गूढ,मात्र ते त्यांचा उद्देश या ना त्या मार्गाने सफल करत असतात तो मात्र आपल्यासारख्या सामान्य आणि मालिकांच्या अधीन झालेल्या प्रेक्षकांना कधीच समजणार नाही.
एक बंगलो दाखवणार त्या मध्ये नायिका, नायक, खलनायिका, खलनायक, सासू सासरे नणंद, धीर, भावजय मुलगा मुलगी घर कामगार (यामध्ये नायिकेला मदत करणारी आणि काही खल नायिकेला मदत करणारी) नोकर चाकर सर्व काही एकच बंगल्यात. वर्ष नी वर्ष तेच ते. आणि त्यात काय दाखवलं जात आरोप प्रत्यारोप, नात्यामधील वाद विवाद, संशय, कट कारस्थान,  दुसऱ्याच्या संसारात विष कालवणे,  सासू सुनेचा वाद, अशांतता, सर्वांनी गमावलेली विश्वासहर्ता, विघ्नसंतोषी पणा,  एकमेकांनी गमावलेला आदर, कुरघोडी करणे, भामटेपणा,लबाडी, विश्वासघात. स्वार्थीपणा.राजकारण, बदला,सूड उगवणे खून करणे.
हे सर्व आपण न कळत आत्मसात करतो. विशेष म्हणजे जेव्हा अश्या मालिका आपण आपल्या मुलांसोबत बघतो  तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा परिणाम होत असतो. त्यांचा घरातील लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
सारखे वेगवेगळ्या मालिका बघणे ह्याला एक व्यसनच म्हणावे लागेल आणि हे प्रमाण जास्तीकरून महिलांमध्ये जास्त आहे. आणि आपण करतो काय मालिकेच्या सुरु होण्याची वाट बघतो सतत झालेल्या भागावर चर्चा  करतो, एखादा भाग परत परत बघतो, पात्राबद्दल आपले मत मांडतो  त्या वर राग व्यक्त करतो, त्या पात्रा ची इतर बर तुलना करतो  नवे ठेवतो आपली महत्वाची कामे सोडून मालिकां पाहत बसणे हे खरी  व्यसनच आहे. आणि मुलांना सतत ओरडतो पुस्तक घेऊन बस अभ्यास कर  कसा शक्य आहे मुळे आपलाच अनुकरण करत असतात हे आपल्याला समजले पाहिजे. वेळीच स्वतःला सावरून घेता आला पाहिजे. आपला आणि आपल्या मुलांचा अमूल्य वेळ दुसऱ्या गोष्टीकडे वळवा. ज्ञानात भर टाकणाऱ्या मालिका जरूर बघाव्यात त्याला कोणता ही अपक्षेप नाही.
एक उदाहरण देतो.
एका बस स्थानकात एक महिला शेजारी एक लहान बाळ पुस्तक वाचत बसल होत आणि ती महिला पण पुस्तक वाचत होती बाकी मुले जी त्या बस स्थानकात होती त्यांचा रडणं ओरडण मोबईल साठी हट्ट हे सगळे चालू होता. एक महिलेने हे सर्व पहिले आणि तिने पुस्तक वाचणाऱ्या महिलेला विचारले की तुमचा बाळ इतका शिस्तबद कसे काय ते मोबईल का मागत नाही शांतपने पुस्तक वाचत आहे ……
त्यावर ती महिला बोली की सवय आपल्याला चांगली असेल तर आपल्या मुलांना पण चांगली सवय लागते मी स्वता मोबईल चा जास्त वापर करत नाही गरजे पुरता करते आणि माझा अनुकरण माझी मुले करतात.
यातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे.
आज आपल्या राज्याचा विचार केला तर सर्वात जास्त शेतकरी (महिला) वर्ग आहे…. आणी हया मलिकचा पण श्रोथा वर्ग तोच आहे. आता आपण बद्दल केला पाहिजे, आपण आपल्या फायद्च्या माहितीच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या मालिका बातम्या बघितल्या पाहिजे. आजून ही शेती आपण पारंपारिक पद्धतीने करतो त्यामूळे उत्पादन कमी भेटत  आहे आणि ह्यची आपल्याला जाणीव पण नाही कारण आपण गरज नसलेल्या गोष्ठी मध्ये रमत आहोत वेळ देत आहोत. आपल्याला आपल्या गरजा कडे प्रगतीकडे बघयला वेळच नाही.  नवीन प्रगत तंत्रज्ञान वापर त्याची माहिती पिका संबंधी माहिती हवामान बद्दल माहिती मुलांचे उच्च शिक्षण याकडे पण आपण पहिले पाहिजे.
आता मालिका हे  एक व्यसन बनत चाले आहे. सर्वच मालीका खराब नसतील काही चांगल्या असतील तर त्या  नक्की बघा तुमचा मनोरंजन करून घ्या विनोदी मालिका बघा  पण ज्या मालिका बघून आपले नकारात्मक विचार वाढतात, नात्यामधील दुरी वाढते मग अश्या मालिका  बघणे कितपत योग्य आहे हा पण विचार करा आता हा विचार करणे गरजेचे आहे .
Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved