पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष – महाराष्ट्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने घेतलेले ऐतिहासिक निर्णय – चित्रपट निर्मिती, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, धनगर समाजासाठी योजना, जलसंपत्ती संवर्धन, मंदिर विकास योजना आणि आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम.
🟩 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष विशेष निर्णय
-
चित्रपट निर्मिती
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्यावसायिक बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती शासनामार्फत होणार.
-
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा.
-
खर्च अर्थसंकल्पातून दिला जाईल.
-
अहिल्यादेवींच्या जलसंपत्ती प्रकल्पांचे जतन
-
घाट, विहिरी, तलाव, कुंडे यांचे सर्वेक्षण व संवर्धनासाठी 75 कोटींचा खर्च.
-
एकूण 34 जलस्रोतांची दुरुस्ती, पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण.
-
अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
-
मंदिर विकास आराखडे (एकूण खर्च: 5503.69 कोटी रुपये)
🟩 महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’
-
महिलांच्या आरोग्य, शिक्षण, सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष.
-
कुपोषण, बालविवाह, लिंगभेद, लैंगिक अत्याचार यावर जनजागृती.
-
उत्कृष्ट ग्रामपंचायतींना “आदिशक्ती पुरस्कार”.
-
खर्च: 10.50 कोटी रुपये.
🟩 धनगर समाजासाठी विशेष योजना
-
‘यशवंत विद्यार्थी योजना’
-
नामांकित इंग्रजी शाळांमध्ये दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना प्रवेश.
-
आतापर्यंत 288.92 कोटी रुपये वितरित.
-
राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने योजना.
-
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’
-
मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महसूल विभाग मुख्यालयांमध्ये वसतिगृह.
-
प्रत्येकी 200 क्षमतेची (100 मुले + 100 मुली).
-
ठिकाणे: नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर.
-
काम प्रगतीपथावर.