शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय 

शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय 

थकवा म्हणजे ऊर्जेची कमतरता आणि झोपेची तीव्र भावना. जीवनशैलीतील बदल आणि इतर अनेक कारणांमुळे अनेकांसाठी हे एक सामान्य लक्षण आहे. या लक्षणांच्या तीव्रतेची श्रेणी सौम्य ते गंभीर असू शकते.

पुरेसा पौष्टिक आहार न घेणे, काही औषधे घेणे, भावनिक ताण, झोप न लागणे, शारीरिक हालचालींचा अभाव, कंटाळा, नियमित मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन  यामुळे शरीराला थकवा येतो.

सफरचंद –

सफरचंद सेवन केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहू शकते. सफरचंद मध्ये भरपूर ऊर्जा असते. याच्या सेवनाने थकवा दूर होतो. अशावेळी आहारात सफरचंदाचे नियमित सेवन करा.

नारळ पाणी –

दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.

केळी –

केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी, हे चारही महत्त्वाचे पोषक तत्व केळीमध्ये (banana) आढळतात, ज्याचे सेवन केल्याने ऊर्जा तर मिळतेच पण माणसाला थकवा जाणवत नाही.

संतुलित आहार – 

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, शरीरात आलेला थकवा घालवण्यासाठी  संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही असलेल्या पोषक तत्वांचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. संतुलित आहार नियमित घेतल्यास  शरीरातील थकवा कमी होतो.

पाणी –

भरपूर पाणी प्या – शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे ऊर्जा कमी होते आणि शरीरात पेटके येतात. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. भरपूर पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात तहान कमी लागत असली तरी लक्षात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. तुम्ही जर लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मिळते.

 ग्रीन टी –

ग्रीन टी मध्ये असलेल्या पॉलीफेनॉलमुळे अँटीडिप्रेसंट प्रभाव निर्माण होतो. शरीरात आलेला थकवा घालवण्यासाठी  त्याचे अँटीडिप्रेसंट गुणधर्म फायदेशीर ठरतात. दुसरीकडे, ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन देखील तणावाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. कमी कॅफिन असलेल्या ग्रीन टीचे सेवन केल्याने तणावाच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो

कोरफडीचा ज्यूस – 

सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. कोरफड शरीरातील गोठलेले फॅट्स वेगाने बर्न करते. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, कोरफडी रसामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.यातील अ‍ॅ न्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.

आवळ्याचे ज्यूस –

आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. अँटी-ऑक्सिडंट म्हणून त्याचा उपयोग होतो प्रत्येक आवळ्यामध्ये 600 ते 700 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह प्रभावापासून वाचवते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. आवळ्याचा रस अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे शरीरात आलेला थकवा निघून जाण्यासाठी मदत होते.

(टीप :- येथे दिलेली माहिती  सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे माहिती In मराठी त्याची हमी देत नाही.)
Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved