शेतीसाठी कडूनिंब – निंबोळी अर्क आणि पावडर
कडू लिंबाच्या झाडालापांढरी लहान आकाराची व सुगंधित फुले येतात. असेच कडू लिंबाच्या झाडाला फळे देखील येतात या फळांचा रंग सुरवातीला हिरवा असतो व पिकल्यानंतर ही फळे पिवळ्या रंगाची होतात. या फळांमध्ये एक मोठा बी असतो त्या बी याला लिंबोणी किंवा निंबोळी असे म्हणतात.
कडुलिंब हे भारत,पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश येथे आढळणारा एक औषधी वृक्ष आहे. त्यालालिंब किंवा निंब असेही म्हणतात. परंतु शास्त्रीय भाषेत कडुलिंबाला AzadirachtaIndica असे नाव देण्यात आलेलेआहे. याला मराठीमध्ये जसे कडुलिंब म्हणतात तसें हिंदी मध्ये नीम व English मध्ये IndianLilak, Neem किंवा MargosaTree असेही म्हणतात. यालाआराध्यवृक्ष असेही म्हंटले जाते.
आपण शेतामध्ये रासायनिक कीडनाशकांचा अधिक वापरामुळे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम झाला आहे. भाजीपाला, फळे, अन्नधान्य व जनावरांच्या दुधातून व मांसातून कीटकनाशकांचे अंश मानवी शरीरात प्रवेश करीत आहे. एवढेच नाही तर आईच्या दूधातून हे कीटकनाशकांचे अंश जणू बाळकडू म्हणून जन्मताच बालकांच्या शरीरात प्रवेश करतात यामुळे मतीमंदता, अपंगत्व यासारखे गुंतागुंतीचे अनेक व्यंग आणि रोग मानवी शरीरात आढळून येत आहेत.
रासायनिक कीडनाशकांचा अधिक वापरामुळे कीटकनाशकांमुळे मित्रकिडी, पक्षांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. हया साठी शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास सजीव सृष्टीची संभाव्य हानी टाळता येईल. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे इतर घटकांसाठी जैविक व वनस्पतीजन्य कीटकनाशकाची उपलब्धता व वापर वाढविणे आवश्यक आहे.
कडूनिंबाच्या निंबोळ्यांपासून उत्तम दर्जाचे कीटकनाशक घरच्या घरी तयार करता येते. कडूनिंब हे आपल्या भारत देशाला निसर्गाने दिलेले जणू एक वरदान आहे. प्रत्येक शेतकर्यां्च्या शेतावर कडूनिंबाचे वृक्ष असतात. पण आपल्याकडे कडू निंबाची विपुलता असून सुद्धा अज्ञानामुळे किंवा आळसामुळे निंबोळीचा पाहिजे त्या प्रमाणामद्धे वापर होत नाही पर्यायाने शेतकरी बाजारातील महागड्या रेडिमेड किटकनाशके का वळतात. सर्व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनासोबत या कडू निंबोळीचा वापर केल्यास कदाचित रासायनिक कीटकनाशकाचा वापर शून्यावर आणून उत्पादन खर्च कमी करता येतो व पर्यावरणाचे/ निसर्गाचे संतुलन राखता येते.
निंबोळी अर्क कीटकनाशक कसे बनवलं :-
कडूलिंबाला मे ते जुन महिन्या दरम्यान निंबोळ्या लागतात या निंबोळ्या पिकल्या नंतर जमिनीवर पडतात या पडलेल्या निंबोळ्या गोळा करून वाळवून साठवून ठेवल्यास त्यापासून घरच्या घरी स्वस्त दरात उत्तम दर्जाचे वनस्पतिजन्य कीटकनाशक बनवता येते. निंबोळी अर्क हा मानवी आरोग्यास अपायकरक नाही त्यामुळे निंबोळीची मागणी आज दिवसेनदिवस वाढत आहे म्हणून जुन महिन्यात झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या गोळा केल्यास त्या पासून कीटक नाशक तयार करता येते व ग्रामीण युवकांना त्यापासून स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो आणि आपल्या देशाला निसर्गाने कडुनिंबाच्या रूपाने दिलेल्या देणगीचा पुरेपूर वापर करता येवू शकतो.
शेतकरी बांधवांनी वेळीच जागरूक होऊन निंबोळी अर्काचा वापर वाढवावा.
निंबोळी अर्का बनवण्यासाठी निंबोळया गोळा करण्याची पद्धत:
निंबोळी बिया जमिनीवर पडलेल्या कच्या किवा शिळ्या गोळा करू नये पिकलेल्या निंबोळया गोळा कराव्यात आणि त्यांची साठवण पोते, बांबू टोपले, गोणपाट यात करावी. गोळा केलेल्या निंबोळ्याचे आवरण व गर स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन काढावे.गर काढलेल्या निंबोळी बिया सावलीत एकेरी थरामध्ये वाळवाव्यात.निंबोळी बियांची साठवण थंड व कोरड्या जागेत करावी.निंबोळी जास्त उन्हामध्ये वाळत ठेवू नये . निंबोळी बियांची प्लास्टिकच्या किंवा सिमेंटच्या पोत्यामध्ये साठवण करू नये.
नींबोळी पावडर :
कडुनिंबाची पाने किंवा निंबोळया वाळवून त्यांची पावडर करून ती 1 ते 2% या प्रमाणात धान्य साठवणुकीसाठी वापरतात, तसेच निंबोळीच्या दाण्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यात मिसळून त्याची फवारणी करतात.
नीम अर्क :
पाने, बिया, दाणे, साल, इत्यादि पासून पाण्यातील अर्क तयार करून त्याचा वापर करतात. निंबोळीच्या 5% अर्काची शिफारस आहे. दाणेदार खतावर आवरण : दाणेदार युरियातील अमोनियाचे विघटन टाळण्यासाठी त्यावर निंबोळी अर्काचे आवरण देतात. त्यामुळे जमिनीत युरिया टाकल्यावर जमिनीतील किडींचे काही प्रमाणात व्यवस्थापन करण्यास मदत होते.
निंबोळीचा 5 टक्के अर्क शेतकरी स्वता: तयार करू शकतात त्याची पद्धत:
फवारणीच्या आदल्या दिवशी ४ – ५ किलो निंबोळी चुरा करून १० लिटर पाण्यात पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच १ लिटर पाण्यात 2५0 ग्रॅम साबनाचा चुरा भिजत टाकावा.दुसर्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क फडक्यातून गाळून घ्यावा. या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेल्या साबणाचे द्रावण मिसळावे.मिश्रण केल्याल्या अर्कमध्ये एकूण १० लिटर होईल इतके पाणी टाकावे. मग आपले 5% निमार्क तयार होते.हा तयार निंबोळीचा १ लिटर अर्क ९ लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी आदल्या दिवशी तयार केलेला अर्कच वापरावा.
निंबोळी पावडर व निमार्क चे सती साठी फायदे :-
निंबोळी पावडर व निमार्क शेतकर्या ना उपलब्ध करून दिल्यास गावातील रासायनिक कीटकनाशकाचा वापर हळूहळू कमी करून कीटकनाशकांच्या माध्यमातून शेतकर्यांंची होणारी आर्थिक लूट व पर्यावरणाची होणारी हानी थांबवता येते.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी केल्यास किडीच्या वाढीवर परिणाम होतो. कोषातुन निघालेले प्रौढ अपंग अथवा विकृत निर्माण होतात. पंखांची वाढ होत नाही. त्यामुळे त्यांची उड्डाण क्षमता कमी होऊन पुढील प्रादुर्भाव व प्रजोत्पादन कमी होते.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी केल्यास त्याच्या वासाने कीड वनस्पतीचे किडीपासून रक्षण होते. पिक कडू होऊन किडीचे खाणे बंद होते व पिकांचे होणारे नुकसान टळते.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी केल्यास किडींना अंडी घालण्यात व्यत्यय येतो त्याच्या वासामुळे पिकांपासून कीटकांच्या माद्या एक तर दूर पळतात किंवा अंडी घालत नाहीत. त्यामुळे त्या पिकावर किडीची वाढ होत नाही किंवा किडींची संख्या अत्यल्प राहून पिकांचे नुकसान टळते.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी केल्यास किडीमद्धे नपुंसकता येते. त्यामुळे मीलन न होता किडे मरतात कीटक ची पुढची पिढी जन्माला येत नाही व पुढील प्रादुर्भाव कमी होतो.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी केल्यास कीटकना नियमित वाढीसाठी ठराविक वेळी कात टाकणे महत्वाचे असते. कात न टाकल्यास कीटकांची वाढ होत नाही. कात टाकण्याची प्रक्रिया खंडित होते आणि कीटक मरून जातात.
निंबोळी पावडर व निमार्क फवारणी मुळे खाद्य पदार्थात विषारी घटक येत नाहीत.निंबोळी पावडर व निमार्क फवारणी पर्यावरण पूरक आहे, मित्रकीटकांना हानिकारक नाही. त्यांचे रक्षण होण्यास मदत होते. पिकांमध्ये जीवाणू अर्क सोडल्यावर पण निंबोळी अर्काची फवारणी करता येते.
निंबोळी पावडर व निमार्क ३०० पेक्षा जास्त पिकांवरील किडी आणि साठवणूकितील किडीसाठी याचा वापर करता येतो. बाजारात वेगवेगळी निमयुक्त कीटकनाशके उपलब्ध आहेत.