शेतकर्यांना ऊस नको रे बाबा म्हण्याची वेळ

शेतकर्यांना ऊस नको रे बाबा म्हण्याची वेळ

 

ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांचे कर्मचारी आणि ऊस तोडणाऱ्या टोळ्या तोडकरी यांच्याकडून उसतोडी साठी भरमसाठ पैसे घेत आहेत आणि खोडवा व नेडवा ऊस तर जाळ्याशिवाय हात लावणार नाही आसे टोळीवाले ठणकावून सांगत आहेत. पैसे दिल्याशिवाय तुमच्या उसाला कोयता लावणारच नाही अशी भूमिका ऊस तोडणाऱ्यांनी घेतली आहे. त्यात पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे तसेच ऊस पिकला पाण्याची टंचाई जाणवत आहे त्यात ऊस तुटून जात नाही. सर्वत्र साखर कारखाना कार्यक्षेत्रात याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

ऊस तोड टोळीच्या भूमिकेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कारखानदारांचे मात्र या प्रकाराकडे नेहमीप्रमाणेच सोयीस्कर दुर्लक्ष सुरू आहे. मुळात उसाचे उत्पादन घटले आहे, त्यात टोळ्यांची वसुली शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत आहे. अशा स्थितीतही टोळ्यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. कारखाना मधील अधिकारी सरळ हात वर करून मोकळे होत आहेत. शेतकर्यांनो पैसे द्या असे आम्ही कधी म्हणत नाही आसे अधिकारी बोलतात पण ऊस तोड करणाऱ्या टोळी वर जरब बसवत नाहीत त्यामुळे ऊस तोड टोळी मनमानी करत आहेत.

 

कारखान्यांना वेळेत ऊस घालविण्यासाठी शेतकरी बांधव धडपडत आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन टोळ्या उघडपणे पैसेची मागणी करत आहेत. मकर संक्रांतीनंतर पैसे मागण्याची पद्धत सुरु होते फेबुरवारी मार्च मध्ये एकरी ५०००/- ते १०,०००/- आणि खोडवा व नेडवा ऊस तर जाळ्याशिवाय कोयता लावणार नाही अशी उगड उगड धमकी देणे ऊस तोड टोळी वाल्याकडून चालू होते. उत्पादन कमी, त्यात ऊस घालवण्यासाठीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. टोळ्यांवर कारखानदारांचे नियंत्रण नसल्याने हे दर वाढतच चालले आहेत. त्यात काही शेतकरी मनमानी करत आहेत आपला असणारा राजकारणी वलयाचा फायदा म्हणा किवा जादा पैसे देवून क्रमपाळी नुसार नंबर नसताना आपला ऊस तोडून घेत आहेत अश्या व्रतीमुळे ऊस तोड टोळी आजून मनमानी करत आहेत.

मग ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना टोळ्यांची खातरदरी करावी लागते. ऊस तोड शेतात आली की मांसाहारी जेवणाचा बेत आखावा लागतो. कधी कधी ओल्या पार्टीचे नियोजन करावे लागते. त्याच्या राशन साठी पैसेही द्यावे लागतात. ट्रॅक्टरचालकाची एंट्री फीसुद्धा २०० ते ३०० रुपये झाली आहे. परत त्याला १ वेळचा डब्बा द्यावा लागतो ते वेगळच. परत ऊसाचे वाढे ही हे ऊस तोडी वाले घेत असतात त्यावर पण शेतकर्याचा अधिकार नसतो आणि वाढे खपावे म्हणून ही मंडळी वाढेयाला ऊस पण ठेवतात ह्या मध्ये पण शेतकरी वर्गाचा खूप नुसकान होत आहे कारण ऊसला वरच्या बाजूल वजन जास्त असते ह्या खातरदरी करता करता शेतकरी अक्षरशः वैतागले असून, शेतकऱ्यांना आता ऊस नको रे बाबा…! असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved