शाळेतच कृषी-शिक्षण

शाळेतच कृषी-शिक्षण

शालेय शिक्षणात कृषी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार मार्फत घेण्यात आला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करत आहेत

कृषी विषयाचा शालेय शिक्षणात कशा प्रकारे समावेश करावा, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याचे कृषी मंत्रीनी सांगितले.

शालेय शिक्षणात कृषी विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे तयार केलेल्या समितीमध्ये परिषदेचे दोन सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळांचे दोन, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे दोन अशा सहा सदस्यांची समिती नेमली होती.

विषयांची पुनर्रचना करताना तसेच पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करताना या अहवालाचा विचार करावा, अशी शिफारस या समितीने केली आहे. तसेच अभ्यासक्रम समितीसमोर हा अहवाल विचारार्थ ठेवावा, असेही अहवालात नमूद केले आहे.

‘‘कृषिकेंद्रित आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल,’’ असा यामागे आग्रह असल्याचे कृषी मंत्र्याचे म्हणे आहे.

सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.९३% असून तो ३% जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल. त्याशिवाय शेतकऱ्या विषयी सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या वयानुसार कृषी क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकविण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होऊन पीक उत्पादन पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो आणि शेतकऱ्यांची नवी पिढी शास्त्रीय सचोटीने शेती व्यवसाय करू शकेल, पर्यायाने उत्पादनात वाढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, तसेच  पर्यावरणाचा समतोल राखण्याची गांभीर्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याबरोबरच जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल असेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पण या निर्णयाचा शेतकऱ्याला किती फायदा होणार हा एक प्रश्न आहे. कृषी हा विषय पदवी, पदविका या माध्यमातून शिकवला जातो.शालेय शिक्षणात जरी हा विषय घेतला तरी नुसती Method माहिती सांगून विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे का तर नाही विद्यार्थ्यांना Pratical जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेती समजणार नाही.

आज आपण पाहतोय कृषी शिक्षणाची परिस्थिती काय आहे ते. ॲग्रीकलचरल कॉलेजमध्ये शिकवायला टीचर आहेत कुठे. आणि असलेच तर त्यांची शिकवण पद्धत कशी आहे ते तुम्हाला माहितच आहे. ॲग्रीकलचरल कॉलेजमध्ये शिकवणारे टीचर सर्व नाही पण ९०% तरी फ्रेशर आहेत ज्यांना शिकवण्याचा तसेच कोर्सचा कुठलाही गंध नाही. काही कॉलेज याला अपवाद असतील परंतु महाराष्ट्रातील बहुतांशी कॉलेज ची अवस्था बघा.

शेतकरी आणि शेती चा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अशा विषयात २०% Method आणि ८०% प्रॅक्टिकल ज्ञान दिल जाईल. शेती पुस्तकात वाचून पिकवता येत नाही त्यासाठी राबवा लागत शेतामध्ये घाम गळवा लागतो. आणि शेती करा म्हणयला गेला तर कृषी शिक्षण घेणारे निवळ कृषी अधिकारी व्हायचं म्हणूनच कृषी शिक्षण घेतात.

आपल्या राज्यात महाराष्ट्रभर कृषी शिक्षण देणारे कितीतरी शाळा कॉलेज आहेत. याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला हे आपण बघतोच आहे.

आणि मला असा वाटता की आता लोक शेती कडे पाठ फिरवू लागले आहेत शहराकडे त्यांचा ओघ जास्त आहे. शेती करणारे कमी झाले तर शेती मध्ये तयार होणाऱ्या कच्चा मालाचे काय होईल उद्योगधंदे चालतील का ? उद्योगधंदेना कच्चामाल उपलब्ध होणार नाही, आता तरी भारतीय अर्थव्यवस्था ६०% शेतीवर आधारित आहे. आणि व्यापारी, राजकारणी, उधोजक आपल्या १० ते १५ वर्ष पुढे विचार करत असतात शेतीकडे लोकच कल वाढवा, लोकानी तोट्यात गेली तरी शेती करत राहिवी हे विचार रुजण्या साठी पण शालेय शिक्षणात कृषी विषय आणला असावा.

 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved