शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा कवच
महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल.
विद्यार्थ्यांसाठी विमा करणारी बँक
महाराष्ट्र सरकारने ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड कंपनीची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. २० ते ४२२ रुपयांच्या प्रीमियम असणाऱ्या योजना असेल ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी विमा उतरवेल आणि ६२ रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी विद्यार्थ्यांसाठी विमा उतरवेल.
विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेचं स्वरुप
विद्यार्थ्यांना 20 रुपये प्रीमिमय भरुन एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. ही पॉलिसीचा कालवधी हा एका वर्षासाठी आहे. आणि 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज पण भेटणार आहे. 422 रुपये प्रीमियम भरल्यास अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हि मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेसाठी पात्रता
विद्यार्थी हा प्राथमिक विमाधारक सदस्य असून महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबध्द, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.
विद्यार्थीन्या आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न केला असेल, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.
महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी हि एक चांगली योजना आहे ह्याचा फायदा विद्यार्थी आणि पालकांनी घ्याला हवा.