विद्युत ग्राहकांचे अधिकार:- भाग -१
शेतकरी आणि शेती संबंधित
भारतातील विद्युत ग्राहकांना विद्युत कायदा, 2003 आणि विद्युत (ग्राहक अधिकार) नियम, 2020 द्वारे विविध अधिकार प्रदान केले जातात. या अधिकारांचा वापर ग्राहकांना त्यांच्या विद्युत पुरवठ्याशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी करता येतो.
वीज कंपनीकडून कडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी विजेचे बिल भरत नाही. परंतू, वीज कंपनी ही शेतकर्याचे हक्काचे पैसे देत नाही जर शेतकर्याच्या शेतातून transformer डी पी किवा विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे नियमानुसार शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे. जे वीज कंपनी शेतकर्याना देत नाहीत. कलम ५७ नुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेता मध्ये transformer डी पी विजेचे खांब लावले जातात त्याचे भाडे म्हणून वीज कंपनीने शेतकऱ्याला २०००/- ते ५०००/- रुपये इतके देणे आवश्यक आहे.
विद्युत ग्राहकांचे अधिकार काय आहेत ते आपण पाहू
-
वीज वाहक तारामधून किवा इतर गोष्टीमुळे शॉर्ट सर्किट झाले तर होणारे नुकसान, जनावराचे मृत्यू मनुष्य हानी पीक जळणे, याची ही भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार. तुम्ही नुसकान भरपाई मागू शकता.
-
नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळाले पाहिजे असा नियम आहे जर ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास वीज कंपनीला द्यावी लागते.
-
शेतात रात्रीच्या वेळी घरामध्ये वीज असणे अनिवार्य आहे यासाठी चौथा (४) योजना चालु. (वीज वियमक आयोग आदेश)
-
विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५. नुसार ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे.
-
शेतामधील किवा घरामध्ये वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे कायद्याने बंधनकारक आहे जर ४८ तासाच्या आत सुरु न केल्यास ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई मिळते.
-
ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ नुसार मीटर चा फोटो न काढता वीज बिल आकारणे चुकीचे आहे. तसे केल्याचे आढळून आल्यास भरपाई म्हणून प्रती आठवडा रु.१०० द्यावे लागते.
-
M.E.R.C.आदेशा नुसार शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ई. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो.
-
विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ नुसार वीजबिलाची थकबाकी असेल तर वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
-
वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ नुसार वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ. खर्च केला असल्यास तो परत मिळतो. खर्च वीज कंपनीने करावयाचा असतो. ग्राहकाने फक्त केल्याल्या खर्चाची पावती जमा करयची असते.