राजमाता जिजाबाई शहाजी भोसले

नवरात्र हा हिंदु धर्मीयांचा स्त्रीशक्ति पूजनाचा उत्सव. आदिशक्ती दुर्गेच्या नवरात्रीत नऊ रुपांचे पूजन, अर्चन करून तिला प्रसन्न केल्या जाते. देवी रुपात स्त्री शक्तीची पूजा केली जाते.
सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज पहिला दिवस ह्या नवरात्री च्या पहिल्या दिवशी आपण आज राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले

 

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते.  जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. पराक्रमी पिता लखुजीराव आणि संस्कार माता म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. बावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात, मुलं दंग असायची. त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या. त्या लखुजीरावांकडे लष्करी प्रशिक्षणासाठी हट्ट धरायच्या. मात्यापित्यांकडून शूरवीरांच्या गोष्टी ऐकून, त्यांच्या मनात सुद्धा स्वराजाची प्रेरणा जागी होऊ लागली. डिसेंबर १६०५ मध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. आणि अगदी वयाच्या ७ वर्षीच मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांचा मुलगा शहाजीराजे भोसले, यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला.

भवानी माते, माझ्या उदरा मधील जीव मला पुत्ररूपाने दे. जो आमच्या कुळाचे नाव काढेल माय भूमीचे पांग फेडेल, धर्म वाढवेल, व जनतेचा रयतेचा एक न्याय प्रतिष्ठित राजा होईल. असा पुत्र दे जो यवनाचे वाढते अत्याचार संपवेल, अशी कळकळून प्रार्थना जिजाबाईंनी भवानी मातेला केली. त्यांची ही प्रार्थना भवानी मातेने ऐकू,न जिजाबाईंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

जिजाऊ स्वराज्याची स्वप्न पाहत असतानाच फाल्गुन बद्ध तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी तो सोन्याचा दिवस उगवला. आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळेस जिजाऊ जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर राहत होत्या.शिवाई देवीच्या नावावरून जिजाबाईनी बाल शिवबाचे नाव शिवाजी असे ठेवले.

मावळे अतिशय इमानदा,र कष्टाळू आणि ताकदवान होते. याची जाणीव जिजाऊंना होती. परंतु कितीही पराक्रम केला तरी, सुलतानांच्या दरबारांमध्ये येणाऱ्या वाईट अनुभवांविषयी जिजाऊंना खंत होती. त्यामुळेच त्या स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवरायांना घडवत होत्या. वीर पुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांचा आत्मविश्वास उंचावत होत्या. लष्करातील विविध शस्त्र चालवण्याच्या, त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ही त्या बारकाईने लक्ष देत होत्या. त्याबरोबरच त्यांना युद्धनीतीचे आणि ज्ञानदानाचे धडे देण्याचे कामही ते अतिशय मन लावून करत होत्या. आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या तर अचूक बजावण्याचा प्रयत्न करत होत्या.

शहाजीराजांनी कर्नाटकातील राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जिजाऊ आणि शिवराय यांची रवानगी पुण्यामध्ये केली. आज आपण मोठ्या अभिमानाने पुणे येथे काय उणे असे म्हणत जरी असलो, तरी त्यावेळी पुण्याची अवस्था अतिशय दयनीय अशी होती. तेथील सर्व मालमत्तेची नास्तधूस केलेली होती. लोक घर सोडून पळालेली होती. कारण त्यांची घरं मोडली जात होती. देवळे पाडलेली होती. लोक गावामध्ये येण्यास तयार नव्हते. शेतावर ठीक ठिकाणी पहारी रोवून ठेवल्या होत्या. आणि तुटलेल्या चपला त्यावर अडकवलेल्या होत्या. जो कोणी येथील जमीन नांगरेल, तो निर्वंश होईल. असा शाप या जमिनीवर आहे, अशा प्रकारच्या भीतीच वातावरण तेथील जनतेमध्ये पसरवलेलं होतं.

रयत घाबरलेली होती. धास्तावलेली होती. अशा वेळेस जिजाऊ शिवरायांसोबत आल्या त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातील बालकांना एकत्र केलं. सोन्याचा फाळ बनवला. सोन्याच्या फाळ असलेल्या नांगराने त्यांनी त्या पाच मुलांना एकत्र घेतलं. आणि ती जमीन नांगरली. लोखंडाला परीसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचे सोनी व्हावे, याप्रमाणे पुण्याचे सोने झाले. परंतु काही करमट लोकांना ही गोष्ट सहन झाली नाही. आणि आता शिवाजी मरेल अशी भीती सर्व दूर पसरली गेली. परंतु जिजाऊ या सगळ्या भीतीला या धमक्यांना पुरून उरणारे होत्या. त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वांश झाले तरी चालेल. पण मी माझ्या गोरगरीब रयतेला उपाशी मरू देणार नाही. असे त्यांनी त्यावेळेस ठणकाऊन सांगितले.

जिजाऊंच्या शिकवणी प्रमाणे शिवरायांनी १८ पगड जातीतील लोकांना एकत्र केले. त्यांची आपापसामधील भांडण थांबवली. त्यांच्या गुणांची पारख केली. त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक तो आत्मविश्वास निर्माण केला. आणि १६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी त्यांच्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

त्यावेळी महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिराची सिद्धी, अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या. अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवरायांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्याचे धाडस केले होते. कारण त्यांना जिजाऊकडून मिळालेल्या आत्मविश्वासाचा प्रचंड असा वारसा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता.

केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे,असे मत राजमाता जिजाऊ यांचे होते. जिजाऊमाता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लाऊन, जिजाऊंनी स्वतःच्या जाधव, भोसले, कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊंनी आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणे सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ स्वराज्य माता आहे. याप्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. संकट समय जिजाऊ लढणारे होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊनी केले आहे. शिवरायांच्या मोठेपणाचे श्रेया जिजाऊंना जाते. यश मिळण्यासाठी तलवार घ्यावी लागते, प्रयत्नांची पराकाष्टे करावे लागते, कारण जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजी राजे, संभाजी राजे, मावळे यांच्यामध्ये असणारी उच्च कोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.

कर्तुत्व मनगटात उतरण्याआधी मनात ठसावे लागते. रात्रीचा दिवस करून, अथक परिश्रम करण्याची मानसिक आणि शारीरिक संपादित करावी लागते. स्वप्नांचा पाठलाग करत असताना समोर येणाऱ्या असंख्य अशा संकटांचा न डगमगता हिमतीने पाठलाग करावा लागतो. आणि तेव्हा कुठे मिळते, स्वप्नपूर्तीचे समाधान. असंच एक स्वप्न पाहिलं होतं, एका मातेने. स्वावलंबनाच, स्वाभिमानाचं आणि स्वराज्याच आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी बाळाच्या जन्म अगोदरपासूनच त्याचा ध्येय निश्चित करून, त्या दृष्टीने वाटचाल करणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊएका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती जगातील महाबलाढ्य साम्राज्य उध्वस्त करू शकते याची शिकवण आई जिजाऊंनी संपूर्ण जगाला दिली…

व्यवहाराची व कर्तव्याची योग्यरीत्या सांगड घालून, अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या जिजाबाई एक धीरगंभीर व्यक्तिमत्व होत्या. प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच होते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून स्वराज्याची स्थापना करणे. यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवण देण्यास सुरुवात केली. शिवरायांनी मावळे सेना जमवली.

जीवाला जीव देणारे सवंगडी कान्होजी म्हात्रे, जीवा महाल, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, इत्यादी. सवगड्यांना एकत्र केले. शिवबांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन, स्वराज्य स्थापनेसाठी संकल्प केला. जिजाबाईंच्या स्वातंत्र्याच्या गर्भसंस्काराचे, पालकत्वाचे, बालसंगोपन मूळ परिपक्व होते. जिजाबाई यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आशीर्वाद शिवबांच्या पाठीशी नेहमी होता. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा ध्यास शिवबांना व मावळ्यांना लागला.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा”. हे जिजाऊंचे स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरवलं, आणि तो सोन्याचा दिवस उगवला, ०६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हा सोहळा त्यांनी याची देही याची डोळा पाहिला. आणि अवघ्या बाराव्या दिवशीच म्हणजे १७ जून १६७४ ला त्यांनी स्वराज्य मध्ये शेवटचा श्वास घेतला.

पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंधकारात, स्वराज्याचे बीजपेरून, स्वराजाचे स्वप्न पाहणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना कर्तुत्वाने उभे करणाऱ्या, शिल्पकार म्हणजे शिवमाता, राष्ट्रमाता, मातृ शक्तीची प्रेरक प्रतिमा सुरक्षा घडवणारी, शिवशक्ती, स्वराज्य जननी, राजमाता जिजाऊ मासाहेब. इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात महत्वाचे स्थान म्हणजे राजमाता जिजाऊ. श्रीमंत योगी अस ज्यांचं वर्णन केलं जातं, ती सारी पुण्याई ध्येयवेढ्या आईची, निराग्रही मातेची, आणि वीर माता मासाहेब जिजाऊ यांची.

!! माहिती In मराठी कडून  राजमाता जिजाऊ यांना मनाचा मुजरा !! 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved