मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०
महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि ते एकूण वीज वापरापैकी २२% वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे.
या समस्यांवर मात करण्यासाठी, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” नावाची एक अभिनव योजना जून २०१७ मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये २ मेगावॉट ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून ५ किमी त्रिज्येत स्थापित केले जातील. शेतीपंप फीडर सोलरायझेशनचे अफाट फायदे पाहता, महाराष्ट्र सरकारने भागधारकांशी तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर योजनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या योजनेची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY २.०) म्हणून पुनर्रचना केली आणि शीघ्रगतीने एकूण ७००० मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्प राबवून, सन २०२५ पर्यंत सुमारे ३०% फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे, ज्यामध्ये शेतक-यांना दिवसा वीज देण्यासाठी 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून 5 – 10 किमी परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले जातील.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, महावितरण शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवणार आहे. जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला जाईल त्या शेतकऱ्याला हेक्टरी वर्षाला ७५ हजार रूपये मिळतील. महावितरण आणि इतर वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे वर्षाला सरळ 3 टक्के भाडेवाढ देखील असणार आहे. मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जात असून,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कालावधी 30 वर्षे आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० च्या काही प्रमुख वैशिष्ट्ये:-
-
या योजनेअंतर्गत, महावितरण शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनीवर ०.५ मेगावॉट ते २५ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसवणार आहे.
-
शेतकऱ्यांना यासाठी जमिनीचे भाडे दरवर्षी एक लाख २५ हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे.
-
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल, ज्यामुळे त्यांचा ऊर्जा खर्च वाचेल.
-
या योजनेमुळे राज्यातील सौर ऊर्जेचा वापर वाढेल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० मध्ये अर्ज करण्यासाठी, खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
-
शेतकरी असल्याचा दाखला
-
जमिनीचे मालकीचे पुरावे
-
बँकेचा पासबुक
-
आधार कार्ड
-
मतदार ओळखपत्र
-
शेतीचा सातबारा
-
जमिनीचा नकाशा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची पात्रता:-
-
लाभार्थी मूळचा महाराष्ट्राचा असावा.
-
शेतकऱ्याला स्वतःची जमीन असणे बंधनकारक आहे ज्यावर तो शेती करू शकतो.
-
या जमिनीची सर्व मुख्य कागदपत्रे शेतकऱ्याकडे असावीत.
-
शेतकऱ्याला जमीन मिळत असेल तर त्यावर व्याज द्यावे लागेल.
-
या योजनेत शेतकरी, बचत गट, सहकारी संस्था, साखर कारखानदार, कृषी पंचायत इत्यादींना सहभागी करून घेता येईल.
शेतकऱ्यांनी महावितरणच्या वेबसाइटवर किंवा महावितरण कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
वेबसाइट:- https://www.mahadiscom.in/solar-mskvy
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल, ज्यामुळे त्यांचा ऊर्जा खर्च वाचेल आणि राज्यातील सौर ऊर्जेचा वापर वाढेल.