फायद्याची शेती बांबू शेती

फायद्याची शेती बांबू शेती

बांबूची शेती आपल्या देशात एक मुख्यप्रमाणे पश्चिम बंगाल, आसाम, उडिशा, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात केली जाते. शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते, पर्यायाने जमिनीचा पोत सुधारतो.

बांबू शेती लागवड

बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही. सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते.

बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५0 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळे ही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत  बांबूची लागवड करू नये. अशा जमिनीत बांबू जरी  होत नाही.

बांबू शेतीचे फायदे

बांबूची शेती भारतात लोकप्रिय होत आहे कारण ही शेती पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत मानली जाते. तसेच यातून चांगले उत्पादन देखील मिळते. भारताचा विचार केला तर भारतात बांबूच्या विविध प्रजाती आढळतात.

भारतात बांबूची शेती हस्तकला, फर्निचर आणि कागद उद्योगासाठी कच्चा माल उत्पादित करण्यासाठी मुख्यत्वे केली जाते. बांबूला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्यामुळे अनके शेतकरी बांबू शेतीकडे वळताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे बांबूचे झाड माती संवर्धन, धूप नियंत्रण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. नॅशनल बांबू मिशन, शेतकऱ्यांना बांबू लागवड, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि त्याचे मार्केटिंग करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.

बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.

बांबूमध्ये मानवेल ही बांबूची जात लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून साधारणपणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेच्याजवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जातीविषयी देण्यात येत आहे.

बांबू शेती रोग व व्यवस्थापन

बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळे सडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, विचेस बूम या रोगात रोपांची वेडीवाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणा-या ब्लाईट या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी सेरेशन या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी प्रतिजैविकांचाही आजकाल उपयोग केला जातो.

बांबू शेती उत्पादन

लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते.बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४o वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.

बांबू तोडण्यावर वन कायदा लागू होणार नाही, असा सध्याचा कायदा आहे. भारत सरकारने मोठ्या प्रमाणात शेतीसाठी राष्ट्रीय बांबू मिशन देखील तयार केले आहे. त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीसाठी शेतकर्‍याला प्रति रोप १२० रुपये सरकारी सहाय्य मिळणार आहे. तसेच, आता त्याचा वापर वाढत आहे, अशा प्रकारे आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळतील.

असं म्हटलं जातं की, जर आपण ३ x २.५ मीटर अंतरावर एक रोप लावलं तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात 1500 झाडे लावली जातील. दोन वनस्पतींमध्ये उर्वरित जागेत आपण एकत्रितपणे दुसरे पीक घेऊ शकता. ४ वर्षानंतर तुम्ही साडे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकाल. दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची लागवड सुमारे ४० वर्षे टिकते.

बांबूची हिरवं सोनं म्हणून ओळख करून दिली जात आहे. तृणवर्गीय बहुवर्षीय पर्यायी पीकपद्धती म्हणून बांबू लागवडीकडे पाहण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात आवश्यक असलेल्या लाकडाला पर्याय म्हणून बांबूकडे पाहिले जात असताना त्याची मागणीही वाढत चालली असून शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवडीकडे पाहिले जात आहे. बहुवर्षीय पीक असल्याने आणि बदलत्या वातावरणाबरोबरच रोगराईचा धोकाच कमी असल्याने शेतकऱ्यांनी आता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहिले पाहिजे.

मानवी जीवनात खाद्यान्न म्हणून ज्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो ती सर्व पिके तृणवर्गीय आहेत. ज्वारी, मका, बाजरी, गहू ही मुख्य पिके एक प्रकारे गवताचाच प्रकार आहे. याचबरोबर ऊसही गवतच म्हणून ओळखले जाते. याच पद्धतीने बांबू सुद्धा एक गवताचाच प्रकार आहे. फार पूर्वी कालापासून या बांबूचा वापर प्रामुख्याने घरासाठी केला जात आहे. झोपडी बांधण्यापासून ते आधुनिक काळातील बांबू हाउस पर्यंत याचा वापर केला जात आहे. याशिवाय घरामध्ये वापरण्यात येत असलेल्या बैठक व्यवस्थेसाठीही बांबूचा वापर केला जात आहे. तसेच बांबूच्या कोवळय़ा कोंबाचा वापर भाजीसाठी आणि लोणच्यासाठीही करण्यात येतो. बांधकाम क्षेत्रात बांबूचा वापर अमर्याद पद्धतीने केला जातो. तसेच इंधन निर्मितीबरोबरच कागद उद्योगामध्येही बांबूचा वापर होत असल्याने बाजारातील बांबूची मागणी वाढतच आहे. आजच्या घडीला बांबू उद्योगातील देशातंर्गत उलाढाल २५ हजार कोटींची आहे.

बांबू प्रक्रिया

बांबूवर रासायनिक प्रक्रियाबांबू केल्यास आयुष्य वाढते अर्धे चिरलेले बांबू ६ ते ८% सी.सी.ए. किंवा सी.सी.बी. चे द्रावण असलेल्या हौदात बांबूचा ३० ते ४० सें.मी. भाग बुडेल अशा त-हेने २४ तास ठेवावेत. नंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच द्रावणात २४ तास बुडवून ठेवावते. त्यानंतर असे प्रक्रिया केलेले बांबू वापरण्यापूर्वी २ ते ३ आठवडे एकत्र साठवून ठेवावेत. अशा त-हेने प्रक्रिया केलेल्या बांबूचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढते व त्यासाठी खर्चसुद्धा कमी येतो.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved