प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे
सूक्ष्म सिंचन योजना ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश पाण्याची बचत करणे, पिकांची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे.
सूक्ष्म सिंचन पद्धती
सूक्ष्म सिंचन पद्धतींमध्ये पाणी थेट पिकांच्या मुळाशी दिले जाते. यामुळे पाण्याची बचत होते, जमिनीची धूप कमी होते आणि पिकांची उत्पादकता वाढते. सूक्ष्म सिंचन पद्धतींमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन पद्धतींचा समावेश होतो.
ठिबक सिंचन
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये, लहान लहान छिद्रांमधून पाणी थेट पिकांच्या मुळाशी सोडले जाते. यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांची उत्पादकता वाढते. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर भाज्या, फळे, फुलझाडे आणि औषधी वनस्पती या पिकांच्या सिंचनासाठी केला जातो.
तुषार सिंचन
तुषार सिंचन पद्धतीमध्ये, लहान लहान छिद्रांमधून पाणी फवारले जाते. यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांची उत्पादकता वाढते. तुषार सिंचन पद्धतीचा वापर धान्य, ऊस, तूर आणि सोयाबीन या पिकांच्या सिंचनासाठी केला जातो.
सूक्ष्म सिंचन योजनेचे फायदे
सूक्ष्म सिंचन योजनेचे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे मिळतात:
- पाण्याची बचत होते.
- जमिनीची धूप कमी होते.
- पिकांची उत्पादकता वाढते.
- शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.
- सूक्ष्म सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
८-ए प्रमाणपत्र
-
७/१२ प्रमाणपत्र
-
पूर्वसंमती पत्र
-
मोटर वीज बिल
-
खरेदी केलेल्या संचाचे बिल
सूक्ष्म सिंचन योजनेसाठी पात्रता
-
शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
-
शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक
-
आधार कार्ड
-
सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
-
विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
-
लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
-
शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल. शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात.
सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा यासाठी राज्य शासन प्रोत्साहनपर पूरक अनुदानाच्या योजना:-
अ) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना :
राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत देय अनुदानास राज्य शासनाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८० टक्के व ७५ टक्के एकूण अनुदान देण्यात येत आहे. सन २०२१-२२,२०२२-२३ व २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून रु. ४६४ कोटी निधी प्राप्त झाला. यातून पात्र ३ लाख १४ हजार २५२ लाभार्थ्यांना रु.४१८.७३ कोटी पूरक अनुदान देण्यात आले.
ब) अटल भूजल योजना
ही योजना १३ जिल्ह्यातील ४२ तालुक्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील १४४० गावांमध्ये केंद्र शासन व जागतिक बॅक यांच्या अर्थसहाय्याने पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक आणि इतर शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे २५ टक्के आणि ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येत आहे.