प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना: तुमचा व्यवसाय वाढवण्याची संधी
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे? अर्ज भरण्याची प्रक्रिया, कागदपत्रे जाणून घ्या…
देशातील छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार अनेकदा मदत देते. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. याच योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. या योजनेंतर्गत विश्वकर्मा समाजातील कुशल कामगारांना त्यांच्या व्यवसायासाठी कमी व्याजदराने अर्थसहाय्य दिलं जातं. तर, ही योजना नेमकी काय आहे? कोण पात्र आहेत? अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? आणि कोणती कागदपत्रं लागतात? याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना म्हणजे काय?
पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही योजना केंद्र सरकारने २०२३ मध्ये सुरू केली आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा शुभारंभ केला. या योजनेंतर्गत देशातील १४० पेक्षा जास्त जातींमधील सुतार, लोहार, कुंभार, गवंडी आणि इतर पारंपरिक कौशल्याधारित कामगारांना कमी व्याजदरात आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेचा उद्देश त्यांच्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भरता साधणे हा आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा महत्त्व
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही कुशल कामगारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कमी व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे लघु व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील. यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होईल आणि त्यांनी आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे नेऊ शकेल.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी पात्रता
ही योजना फक्त विश्वकर्मा समाजातील १४० पेक्षा जास्त जातींना लागू आहे. परंतु, लाभ घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत:
-
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये.
-
अर्जदार आयकर भरत नसावा.
-
अर्जदार कौशल्याधारित पारंपरिक व्यवसायात असावा.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रं ठेवावी लागतील. ती खालीलप्रमाणे आहेत:
-
आधार कार्ड
-
बँक पासबुक
-
जात प्रमाणपत्र
-
उत्पन्नाचा दाखला
-
रहिवासी प्रमाणपत्र
-
चालू मोबाईल नंबर
-
पासपोर्ट साइज फोटो
अर्ज भरण्याची प्रक्रिया
अर्जदाराला अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
सर्वात आधी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं.
तिथं आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी.
मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करा.
त्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन करावं.
या प्रक्रियेनंतर अर्जाची फॉर्म ओपन होईल. तिथं सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
आवश्यक कागदपत्रं (आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, इ.) स्कॅन करून अपलोड करा.
सर्व काही व्यवस्थित भरल्यानंतर “अर्ज दाखल करा” वर क्लिक करून अर्ज सबमिट करा.