नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत ६,०००/- रुपयांची भर घालण्यात येणार आहे. म्हणजे केंद्र सरकार ६,०००/- आणि राज्य सरकार ६,०००/- अशी एकूण शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत त्या लोकांनाच या योजने चा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान योजनेची वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.
नमो शेतकरी महासन्मान योजने मुळे राज्यातील जवळपास १ कोटी १५ लख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेसाठी अंदाजे ६ हजार नऊशे कोटी रुपये इतकी रक्कमे ची तरतूद करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय ते समजेलच.
नमो शेतकरी महासन्मान योजनेत पीकविम्या साठी शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार त्या हिस्स्या ची रक्कम भरणार आहे. शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येईल. त्यासाठी ३ हाजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये समृद्ध शेतकरी, शाश्वती शेती,महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा, पर्यावरणपूरक विकास, इत्यादी गोष्टीचा समावेश आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थीनी पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, त्या बँक खात्यला मोबाईल नंबर, आधार नंबर लिंक करयला हवा आधी पासून लिंक असेल त्तर सर्व उत्तम. महाराष्ट्र राज्यात असे 12 लाख शेतकरी आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये. लिंक नसलेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.