सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज चवथा दिवस ह्या नवरात्री च्या चवथ्या दिवशी आपण आज ताराबाई राजाराम भोसले यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.
!! महाराणी ताराबाई राजाराम भोसले !!
महाराणी ताराबाई भोसले या मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी होत्या. महाराणी ताराबाईंचा जन्म 1675 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बहीण सोयराबाई ही छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी आणि त्यांचा धाकटा मुलगा राजाराम महाराजची आई होती.
लहानपणी त्यांना तलवारबाजी, धनुर्विद्या, घोडेस्वार, मुत्सद्देगिरी आणि राज्यकलेच्या इतर विषयांचे उत्तम प्रशिक्षण मिळाले होते. महाराणी ताराबाई मुघल साम्राज्याच्या विघटनात सर्वात महत्वाचे योगदान देणाऱ्यांपैकी एक होती. छत्रपती संभाजी राजायांनी राजाराम राजे यांचा विवाह हंबीररावांच्या कन्या ताराबाईशी ठरवला. महाराणी ताराबाई यांचा 1683 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी राजाराम महाराजांशी लग्न झाले आणि त्यांची दुसरी पत्नी झाली. छत्रपती राजाराम महाराजांना एकूण चार पत्न्या होत्या.
ताराबाईंना त्यांच्या वडिलांची प्रतिभा आणि उर्जा वारसाहक्काने मिळाली होती, जी त्यांनी मुघलांविरुद्धच्या २७ वर्षांच्या युद्धाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात दाखवली होती.
छत्रपती राजाराम महाराज यांचे मार्च 1700 मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यांतर महाराणी ताराबाईंनी शांततेच्या तहाची मुगलशी बोलणी चालू केली पण मराठ्यांच्या विरोधात ‘पवित्र युद्ध’ पुकारणारा औरंगजेब कोणत्याही शांतता प्रस्तावाला मानणारा नव्हता. खाफी खानने त्यांच्या विचारांचा समर्पक सारांश दिला होता की ‘दोन लहान मुले आणि एका असहाय स्त्रीवर मात करणे मुगल साम्राज्याला कठीण होणार नाही.
औरंगजेबाला मराठा साम्राज्य दुर्बल आणि असहाय्य वाटत होता. शांतता अटीच्या प्रत्युत्तर मध्ये औरंगजेबाने ‘हमकिला बधंद’ फक्त दोन शब्दांत नकार दिला. हमकिला बधंद या शब्दाचा अर्थ असा होता की प्रत्येक किल्ल्याला बिनशर्त आत्मसमर्पण होईपर्यंत कोणतीही वाटाघाटी नाही
छत्रपती राजारामांच्या मृत्यूने आणखी आशा निर्माण केली की जर जोरदार धक्का दिला तर मराठा साम्राज्याचा नाश होणार होता. म्हणून त्यांनी भारताच्या उत्तर भागात नियुक्त केलेल्या विविध राज्यपालांकडून नव्याने मजबुतीकरण करण्याचे आदेश दिले.
महाराणी ताराबाईनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला. मराठा सैन्यातले शूर सरदार व सेनापती धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला. अखेरीस अपयश घेऊन येथेच त्याच्या मृत्यू झाला. या काळात ताराबाई आणि शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच होता. १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी पराभूत केले. जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून ताराबाईंनी स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
शाहू मोगलांच्या कैदेत असताना ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजीचा विशाळगड येथे राज्यभिषेक करून त्याच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या. त्यांनी सैन्याधिकाऱ्यांची नेमनूक करून औरंगजेबाला खुले आव्हान देत युद्ध सुरू केले. १७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर ताराबाईने पन्हाळा ही मराठा राज्याची राजधानी केली. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे बळ कमी व्हावे, म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली. १७०० ते १७०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंनी परत मिळवले.
औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. ते तोतया नसून खरे शाहू आहे, याची खात्री ताराबाईने करून घेतली. त्यानंतर शिवाजी महाराजांचे खरे वारसदर आपणच आहोत असा दावा शाहू महाराजांकडून करण्यात येऊ लागला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहू महाराजांनी मिळविले. ताराबाईंच्या पक्षातील योद्धे बाळाजी विश्वनाथ, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर यांच्यासारखे मातब्बर सरदार मंडळींना शाहू महाराजांनी आपल्या बाजूला वळवून घेतले व या युद्धात महाराणी ताराबाईचा पराभव झाला.
महाराणी ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली.
मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले, व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.
हाराणी ताराबाईंचे वयाच्या ८६व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले
महाराणी ताराबाईं या इतिहासातील एक कर्तबगार धाडसी महिला होत्या. त्यांनी दिलेला स्वराज्यासाठीचा ला नेहमीच लक्षात राहील.
!! माहिती In मराठीकडून महाराणी महाराणी ताराबाईं यांना मनाचा मुजरा !!