झाड
झाडे अंदाजे ३७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. पण आता स्वार्थी माणसाने आणि शासनाने विकासाच्या नावाखाली हजारो वर्षे जुनी झाडे तोडली. शेतकऱ्याने बांध, बांधूरे, ताली ठेवल्या नाहीत. शेतकऱ्याने ओढे, नाले, ठेवले नाहीत काहींनी ठेवले ते अतिशय कमी. शहरात सुद्धा तीच अवस्था आजूबाजूची गावे शहरात जमा झाली. शेतकरी गुंठा मंत्री झाले. सिमेंटची जंगले उभी राहिली, जुनी झाडे, वृक्ष संपदा संपून गेली. `सूर्य आग ओकतोय, राजस्थानात 50 डिग्री तापमानाची नोंद आहे महाराष्ट्र ४५ डिग्री तपमानाकडे झुकू लागला आहे. आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे पण एसी कधी घेणार, आज भारतात 500 कोटी झाडांची गरज आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे, 45°C ते 49°C हे तापमान 55°C ते 60°0 व्हायला वेळ लागणार नाही. ५६ डिग्री पुढे मानवी जीव तग धरू शकणार नाही.
अजून वेळ गेलेली नाही या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने 1 तरी झाडे लावा, अन्यथा जळुन मरावे लागेल. येणारी पिढी तडपडून मारायची नसेल तर, किमान एक तरी झाड आपल्या आई, वडील, मुलगा मुलगी, बायकोच्या नावाने अवश्य लावा.
गावचा मुख्य रस्ता ते गावची वेस, शाळा, सरकारी जागा, रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडे लावा.
जो तुमचं सुखदुःख वाटून घेतो तो तुमचा सोयरा. तुकोबा म्हणतात, “झाडं, वेली, वनात राहणारे वनचर, स्वच्छंदपणे आपल्याच नादात गाणारे पक्षीच आपले सोयरे.” रस्ते बनवताना पाच-पाचशे वर्षांचे वड काढलेत. आता हायवे आहे, पण पाच मिनिटे गाडी लावायला सावली नाही.
झाड कधीही स्वार्थ पाहत नाही.
झाडे प्रदूषणाचे कण शोषून घेतात व प्रदूषण कमी करतात. झाडे उष्णता शोषून घेतात व थंड हवा देतात नि उन्हाळ्यात आपले गाव, शहर वा नगर वातानुकूलित ठेवण्याचे कार्य करतात. त्यासाठी एसीसारखे कोणतेच महागडे विद्युत उपकरण लागत नाही व विजेचा खर्चही काहीच लागत नाही. वातावरणातील जवळपास ४० टक्के बॅक्टेरिया झाडे शोषून घेतात व रोगजंतू कमी करतात. झाडांमुळे शहरातील गोंगाटही १५ डेसीबल्सने कमी होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रासही कमी होतो. ज्या भागात झाडे जास्त असतात त्या भागात झाडांच्या पानांतून बाष्पीभवनाची क्रिया सतत सुरू असते. ती तयार झालेली वाफ वातावरणात जाते व झाडावरील वातावरणातील उष्णता कमी होते म्हणून हवेत गारवा जास्त राहतो. त्या गारव्यामुळे पुढे निघून जाणाऱ्या ढगांचा वेग खूप कमी होतो व ते तेथे पाऊस पाडतात. झाडामुळे वादळी वार्याचा वेग कमी होतो व होणारे नुसकान टाळता येते.
असा बोलतात कि झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते. एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी _संपूर्ण पावसाळ्यात_ जमिनीत घेऊन जाऊ शकते.
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते. एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
काही देशी झाडांची नावे आहेत, वड, पिंपळ, बोर, बाबुळ, सिसम, चंदन, ऊंबर, कडुलिंब, करंंज, रूद्राक्ष, बेड्या, हीरडा, आवळा, पारीजातक, पळस, पांगारा, चिंच, गावरान अंबा, लक्ष्मीतरु, अर्जून, कदंबा, पुत्र जीवा, काटेसावर, भोखर, फणस, खैर, बेल, अशाप्रकारे देशी झाडे या पावसाळ्यात प्रत्येकाने लावली पाहिजेत.
झाडे असतील तरच पाणी असेल आणि पाणी असेल तरच माणूस जिवंत असेल. आतापासून झाडे लावा, कारण एक झाड मोठे होऊ शकते, यासाठी 5 ते 7 वर्षे लागतात.