कोहळा पृथ्वीवरील अमृतफळ

कोहळा पृथ्वीवरील अमृतफळ

कोहळा ही आपल्या देशात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे. हिला ग्रामीण भागात पांढरा भोपळा असेही म्हणतात. हा दुधी भोपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो. हे फळ आकाराने आवळ्यासारखे गोल असते. घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.

कोहळा उपयोग:-

कोहळा मनास बल देणारा, ताण तणाव, चिंता कमी करणारा आणि व्यक्तीस मानसिक स्थैर्य देणारा आहे. कोहळा शितल असल्याने गरमीचे अनेक रोग नाहीसे करतो, हृदय मजबूत करतो, रक्तदाब संतुलित ठेवतो, भयंकर असा पित्ताचा प्रकोप सुद्धा शांत करतो. कोहळा आतड्यांचा बळ देतो आतड्यातील अननस शोषण त्याचे रक्तात रूपांतर करण्यास होण्याची खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप लावावा, आम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून घ्यावे.

कोहळाचे औषधी गुणधर्म

कोहळा हा शीत, लघू, स्निग्ध, मधुर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, आर्द्रता, अ आणि ब जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. त्याच्या या औषधी गुणधर्मामुळे आहारामध्ये त्याचा आवर्जून वापर करावा. कोहळ्याचे थालीपीठ, पराठा, भाजी, कोहळा रस व सूप असे अनेक प्रकार बनविता येतात…

कोहळाचे औषधी उपयोग

कोहळा सप्तधातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वाढीच्या वयातील मुलांना याची नियमितपणे थालीपीठ, भाजी करून द्यावी. यामुळे मुलांची सर्व अवयवांची वाढ चांगली होऊन उंची देखील वाढते.

स्मरणशक्ती व बुद्धीवर्धनासाठी देखील कोहळा अत्यंत उपयुक्त आहे. मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढविण्यासाठी कोहळ्याचा आहारात वापर करावा. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.

कोहळ्यामध्ये तंतुमय पदार्थ व आर्द्रता भरपूर असल्याने मलावरोधाची तक्रार असलेल्यांनी कोहळ्याची भाजी खावी. यामुळे शौचास साफ होते. मूळव्याधीचा त्रास होत असेल व शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर कोहळा आवर्जून खावा.

जुनाट ताप, सर्दी, खोकला, क्षयरोग, टायफॉइड, मलेरिया, कावीळ आदी आजारांमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर कोहळा हे उत्तम टॉनिक आहे…

नाकातून रक्त येणे या विकारात कोहळ्याचा रस प्यावा, कारण कोहळा हा रक्त पित्तशामक असल्याने लगेचच आराम मिळतो.

कोहळा हा शुक्रवर्धक असल्याने व धातूदौर्बल्य दूर करून धातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी कोहळ्याचा रस खडीसाखर घालून प्यावा.

हृदयविकार असणाऱ्यांनी हृदयाचे बळ वाढविण्यासाठी कोहळा रस किंवा कोहळा सूप प्यावे.

कोहळा पासून तयार झालेलेकोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो. हा बाजारात मिळतो. हा द्रवस्वरूपात असतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.

भाजलेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी कोहळ्यांच्या पानांचा किंवा फळाच्या आतील गर त्वचेवर लावावा. त्यामुळे लगेचच दाह कमी होतो.

कृश व्यक्तींनी धातूदौर्बल्य कमी होऊन शरीराचे पोषण होण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी कोहळ्यापासून बनविलेला कोहळेपाक नियमित खावा.

गर्भवती स्त्रीने कोहळ्यापासून बनविलेला कुष्मांडावलेह या अवलेहाचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे गर्भस्थ बाळाचे व मातेचे पोषण व्यवस्थित होते…

“तळहात, तळपाय यांची आग होत असेल व त्याबरोबर जळवात हा विकार झालेला असेल तर रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवावा, त्यामुळे थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात…”

चेहऱ्यावरील मुरुमे, काळे डाग कमी करून सौंदर्य वाढवण्यासाठी कोहळ्याचा गर चेहऱ्यावर लावावा.

मूतखडा झालेला असल्यास तसेच लघवी साफ होत नसल्यास व लघवीला जळजळ होत असेल तर कोहळ्याचा रस प्यावा.

शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये कोहळ्याचे सेवन आवर्जून करा. आपल्याकडे भाजीत कोहळ्याचे तुकडे घातलेले दक्षिण भारतीय सांबार, रायते, सूप, सांडगे, कोहळेपाक, पेठा, इत्यादी कोहळा पासून तयार झालेले पदर्थ मिळतात.

वास्तुशास्त्रातील कोहळाचे महत्त्व

वास्तूमधून नजरदोष शोषून घेतल्यावर हे फळ नासते. म्हणजे दरवाज्यावर टांगलेला कोहळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे समजून, पुन्हा दुसरे फळ घरात उंबरठ्यावर चार चौघांना दिसेल असे बांधून ठेवतात..

कोहळा लावण्याची योग्य पध्दत:- 

कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. कोहळा लावताना नेहमी  शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा.

कोहळाच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.

कोहळा लावताना नेहमी खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,

येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.

कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर) नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.

कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.

कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो घरातील व्यक्तीची चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. 

एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो. व त्या व्यक्तीच्या वाईट विचाराचा परिणाम घरावर होत नाही. 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved