प्रधानमंत्री जन धन योजना

माहिती In मराठी

 

प्रधानमंत्री जन धन योजना

देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सरकारकडून खातेदारांना अनेक सुविधा पुरविल्या जातात. प्रधानमंत्री जन धन योजना ही अशीच एक योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना आर्थिक कक्षेत आणण्याचा आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी सुरू केली होती. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात याची घोषणा केली होती

जन धन खातेधारकांना सरकार १०,०००/- रुपये मिळत आहेत, यासाठी त तुम्हाला अर्ज करावा लागेल. प्रधानमंत्री जन धन योजनेद्वारे देशाभरात जवळ जवळ ४९  कोटींहून  जास्त खाती उघडण्यात आली आहेत. पण लाखो लोकांना जन धन खाते वरील उपलब्ध असणाऱ्या सुविधा आपल्येल्या माहिती नाही. आता एक फायदा हा बघू जनधन खातेधारकांना सरकार १०,०००/- रुपये देत आहे,  त्यासाठी तुम्हाला तुमच्या  जन धन खाते असणाऱ्या बँक शाखेत अर्ज करावा लागेल. तसेच आजून ही काही फायदे आहेत,१,३०,०००/- रुपये इतका विमा पण मिळतो अजून एक फायदा म्हणजे खातेदाराला त्याच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही म्हणजे शून्य रुपये असले तरी चालतील. खात्यामध्ये किमान रक्कम असणे बंधनकारक नाही हया खात्यचा अजून एक फायदा म्हणजे  RuPay डेबिट कार्ड  प्रधान केले  जाते आता पर्यंत  ३३  कोटी RuPay डेबिट कार्ड  प्रधान केले आहेत, तसेच  तुमची इच्छा असल्यास तुम्ही या खात्यावर १०,०००/- रुपयांच्या ओव्हरड्राफ्टसाठी बँकेकडे अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल.

जन धन योजनेतील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी अटी
  • १. बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खाते किमान सहा महिने चालू असले पाहिजे
  • २. कुटुंबातील कमावत्या सदस्याला १०,००० दिले जातील, (महिलांना प्राधान्य)
  • ३. खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • 4. आरबीआयच्या निर्देशानुसार तुमचे इतर कोणत्याही बँकेत/शाखेत खाते नसावे
  • १८ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना ही सुविधा मिळते.
  • या योजनेत तुम्ही कोणत्याही अटीशिवाय २००० रुपये काढू शकता. योजनेशी संबंधित सर्व माहिती तुम्ही या लिंकवर https://www.pmjdy.gov.in/scheme  मिळवू शकता.

अपघाती मृत्यू झाल्यास मला काय मिळेल?

सरकार जनधन खातेधारकांना 1 लाख रुपयांच्या अपघात विमा पॉलिसी सह अनेक फायदे प्रदान करते. याव्यतिरिक्त, ३०,०००/- रुपयांची जीवन विमा पॉलिसी ऑफर केली जाते. अपघाती मृत्यू झाल्यास, खातेदाराच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. दुसरीकडे, सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास, ३०,०००/- रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

जर तुम्हाला या कार्यक्रमांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हे खाते उघडू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved